When you are climbing the mountains,
be steady and be consistent with every step.

B I O G R A P H Y

"Empowering education and creating happiness"
- Devendra Anant Tamhane
Shri Devendra Anant Tamhane – A Torchbearer of Education and Human Values
Shri Devendra Anant Tamhane is a living embodiment of dedication, wisdom, and quiet service. With a profound belief in "Empowering education and creating happiness," his life journey reflects not just academic brilliance but a relentless commitment to uplifting young minds and nurturing future citizens. Hailing from Maharashtra, he completed his M.Sc. in Physics from the University of Mumbai, and later pursued a specialization in Mycology with distinction. For over 35 years, he has passionately worked across various cities in Maharashtra, guiding students, teachers, and parents with clarity, compassion, and purpose.
Meghalaya Initiative
Month-long program for rural teachers and students
Early Days
Founder of Chintan Classes (1997-2020)
Multiple Roles
Academic Excellence Coach, Career Counselor, Educational Mentor
Educational Guidance
Coached 10,000+ students across Maharashtra
Real Stories, Real Impact
See what people are saying about Shri Tamhane's work
इयत्ता दहावीच्या सीबीएससी बोर्डाचा निकाल
364 दिवस मेहनतीचे आणि एक दिवस आनंद साजरा करण्याचा दिनांक 13 मे 2025 रोजी इयत्ता दहावीच्या सीबीएससी बोर्डाचा निकाल लागला. त्याच्या दोन दिवस आधीपासून टिया मला सतत फोन करत होती, सर रिझल्ट कधी लागणार? दहावीचा रिझल्ट एक वाजता लागेल असे सांगितले होते आणि परत काही कारणाने थोड्या वेळ रिझल्ट दिसत नव्हता. टिया सारखेच अनेक विद्यार्थ्यांचे टेन्शन त्यामुळे नक्कीच वाढले असणार. शेवटी काही वेळानंतर डीजी लॉकर मध्ये विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. टिया दहावी मध्ये 60 टक्के मिळून पास झाली. थोड्यावेळाने तिच्या आईचा फोन आला. सर आम्ही खूप रिलॅक्स आहोत त्याला खूप छान मार्क मिळाले आता तिच्या पुढच्या अभ्यासाची जबाबदारी सुद्धा तुमच्यावरच आहे. जी जबाबदारी आपण घेतली ती जेव्हा यशस्वीरित्या पूर्ण होते त्यावेळेस होणारा आनंद अवर्णनीय असतो. इयत्ता नववीच्या सहामाही परीक्षा नंतर टियाच्या आईचा फोन आला त्यांना माझा नंबर आदरणीय डॉक्टर Anand Nadkarni सरांनी दिला होता. टियाला गणित आणि विज्ञान हे विषय समजायला अडचण जात होती. तिच्या नववीच्या वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने आम्ही तयारी चालू केली. यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीया पनवेलला राहते आणि मी कल्याणला. त्यामुळे प्रत्यक्ष भेटणे शक्य नव्हते. ऑनलाईनच अभ्यास चालू केला. सध्या अनेक विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाइन शिकत आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून विविध देशातील विद्यार्थ्यांना शिकवायला मिळते ही खूप मोठी संधी कोरोनाने निर्माण केली आहे. दोन महिने त्याने मी सांगतो तसा अभ्यास केला आणि त्याचा परिणाम म्हणजे या इयत्ता नववी व्यवस्थित पास झाली. #empowering #education and #creating #happiness आता प्रश्न होता इयत्ता दहावीचा त्याच्यासाठीचे वर्षभराचे नियोजन कसे केले तिच्याकडून अभ्यास कसा करून घेतला वर्षात फक्त एखाद्या विद्यार्थ्याला आपण एकदा किंवा दोनदाच भेटत असलो तरीही त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी सतत प्रेरित आणि प्रोत्साहित राहणे आवश्यक असते आणि हे सगळे करून घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांचा निकाल अपेक्षित असा लागतो. शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी खास पनवेल वरून पेढे द्यायला टिया आणि तिची आई कल्याणला आल्या होत्या. टियाला पुढील शिक्षण कला शाखेत घ्यायचे आहे. तसेच तिची चित्रकला ही अतिशय छान आहे. ( टियाकडून मला एक खास भेट मिळणार आहे. मी त्याचीही वाट बघत आहे. त्याबद्दल ती भेट मिळाल्यानंतर खास लिहिणार) त्यामुळे दहावीचा महत्त्वाचा टप्पा पार पडल्यानंतर आता तीचा आत्मविश्वास वाढला आहे. मला नक्की खात्री आहे की तिच्या बारावीच्या वर्षात ती याच्याही पेक्षा जास्त गुण मिळवेल.

Gopal Sathe
StudentCongratulations to Tiyaa and to you too Sir !!! She has taken proper lessons from you and implemented them in her studies and the impotant thresh-hold Examination for her . Best luck for all her efforts that will be taken up by the little Tiya in her future Examinations ( of course , under your tireless guidance .

Nilu Deshkar
ParentCongratulations to Tiya and Congratulations too You Sir.....Great job 👏

Pranjal Prathamesh Phatak
Teacherअभिनंदन टिया आणि सर तुमचे 👍

Vaibhav Joshi
TeacherYes sir this was live example of true partnership...both of u contributed.....thank you very much for making this happen

Manoj Oak
TeacherGreat Devendra....you are an Angel...Fulfilling Dreams
गुढीपाडव्याला कल्याणच्या नववर्ष स्वागत
रविवार दिनांक 30 मार्च 2025. दरवर्षी गुढीपाडव्याला कल्याणच्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होत असतो. नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणे हा एक अतिशय उत्साहवर्धक अनुभव असतो. स्वागत यात्रेमध्ये अनेक व्यक्तींना एकाच वेळेस भेटण्याची आणि गुढीपाडव्याच्या तसेच नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याची संधी मिळते. प्रत्येक सणामध्ये विविध कलागुणांना वाव मिळत असतो. जसे की रांगोळी काढणे, विविध वाद्य वाजवणे, स्वागत यात्रेसाठीचे रथ तयार करणे, एवढेच नाही तर विविध संस्थांच्या प्रचार आणि प्रसार सुद्धा स्वागत यात्रेच्या माध्यमातून होत असतो. विविध ठिकाणावरून येणारे प्रवाह एकत्र होतात आणि त्यांची पुढे जाऊन नदी बनते. त्याचप्रमाणे चंद्रसेनीय कायस्थ प्रभू, कोकणस्थ मराठा, दैवज्ञ ब्राह्मण संघ, ब्राह्मण संघ, असे विविध समाज बांधव तसेच योग विद्या धाम, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, व्यावसायिकांचा सॅटर्डे क्लब, बालक मंदिर संस्थेच्या विविध शाळा, सुभेदारवाडा शाळा, अक्षर मंच, महावितरणचे कर्मचारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व त्यांचे कर्मचारी, पाठारे नर्सरी, शेगावचे गजानन महाराज भक्त मंडळ, आर्ट ऑफ लिविंग, प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्था, असे सर्वजण स्वतःच्या कार्याची ओळख देणारी कलाकृती सादर करत स्वागत यात्रेत येतात. पण एकदा स्वागत यात्रेत सहभागी झाले की आपणास हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे एकजिनसी रूप अनुभवता येते. यावर्षी प्रथमच डोंबिवलीला नववर्ष स्वागत यात्रेत मी आणि सानिका सहभागी झालो. कारणही तसेच महत्त्वाचे आहे. डोंबिवली मधील 'हम' या संस्थेच्या मार्फत जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवल्या जातात, वसतिगृह चालविले जाते, प्रयोगशाळा तयार केल्या जातात. येणाऱ्या वर्षात हम संस्थेच्या सहकार्याने जम्मू कश्मीर मधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जम्मू कश्मीर मधील कटरा येथील वसतिगृहातील 32 विद्यार्थी सांस्कृतिक देवाण घ्यावेणीच्या उद्देशाने डोंबिवली मध्ये आले आहेत. त्यांच्याबरोबर हम या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत मनोज नशिराबादकर सर तसेच त्यांचे अनेक कार्यकर्ते आज नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले. मला पण हम संस्थेचे श्री जयंत पित्रे यांनी या विद्यार्थ्यांबरोबर तसेच संस्थेच्या अन्य कार्यकर्त्यांबरोबर ओळख होण्याच्या निमित्ताने यावर्षी नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्याची संधी दिली. सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजता सर्वेश हॉल डोंबिवली येथे या विद्यार्थ्यांच्या बरोबर एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आपल्यापैकी कोणाला इच्छा असेल तर आपण सुद्धा नक्की सहभागी होऊ शकता. काही वेळ डोंबिवलीच्या स्वागत यात्रेत त सहभागी झाल्यानंतर मग मी आणि सानिका कल्याणच्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झालो. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा अतिशय उत्साहात नववर्ष स्वागत यात्रेमध्ये कल्याणकर सहभागी झाले होते. सर्व ब्राह्मण संघातर्फे गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन माझे आणि Madhavi Sakore Tamhane स्वागत केल्या गेले. तेथेच देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अनेक कार्यकर्ते सुद्धा भेटले. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वागत यात्रेत फिरत असताना अनेक सारे विद्यार्थी भेटतात आवर्जून सध्या ते काय करतात याबद्दल एक दोन मिनिटे चर्चा होते. काही विद्यार्थी सध्या कल्याणच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत असे विद्यार्थी जेव्हा नमस्कार करतात त्यावेळेस ते पक्के राजकारणी झाले आहेत याची जाणीव होते. राजकारणात नसलेला विद्यार्थी आणि राजकारणात असलेल्या विद्यार्थी यांची नमस्कार करण्याची किंवा पाया पडण्याची पद्धत वेगवेगळी असते. अशा असंख्य विद्यार्थ्यांना नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन मलाही खूप छान वाटते. हल्ली तर अनेक वेळा विद्यार्थी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पती किंवा पत्नी आणि एखादे लहान मुल असते. मग खास त्या मुलाला हे माझे टीचर आहेत अशी सेमी इंग्लिश मध्ये ओळख करून दिली जाते. ओळख करून देत असतानाच आपण कसे वर्गात मस्ती करत होतो किंवा सरांनी आपल्याकडून कसा अभ्यास करून घेतला, एखाद्या विषयात आपल्याला मदत कशी झाली अशी आवर्जून खास ठेवणीतली गोष्ट सहजपणे व्यक्त केली जाते. सध्या बोलताना एक गोष्ट खूप जाणवते ती म्हणजे अनेक विद्यार्थ्यांची पुढची पिढी आता इंग्रजी माध्यमात शिकत आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना फक्त एक विद्यार्थीच नाही तर त्याचे कुटुंब सुद्धा आमच्या संपर्कात असते आणि ही खूप मोठी संधी आहे असे मला नेहमी वाटते .सध्या जाणवते की तो विद्यार्थी शिकत असतानाच त्याचे कुटुंब नाही तर त्याच्या विवाह नंतरच्या कुटुंबातही एक शिक्षक म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून वेगळी ओळख करून दिली जाते. #empowering #education and #creating #happiness दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संध्याकाळी सहकुटुंब टिटवाळ्याला महागणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन हिंदूं नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा आनंदात आणि उत्साहात साजरा केला.

Pranjal Prathamesh Phatak
Educatorस्वागत यात्रेत सहभागी होण्याचा अनुभव खरंच खूप छान असतो.. चैतन्य आणि नाविन्याला वैविध्यपूर्णतेची दिशा देणारा अनुभव!! मस्त लिहिलं आहेत सर..

सुबोध राजे
Local Teacherखुप छान नव वर्ष स्वागत यात्रेचे वर्णन केले आहेस वृंदा अभिनंदन
Mumbai to Meghalaya Book Launch
Celebrating the launch of 'Mumbai to Meghalaya' - a journey of educational transformation.

Meera Joshi
ReaderJust finished reading your book. It's a beautiful narrative of service and dedication. Highly recommended!

Arjun Kulkarni
Former StudentThis book captures the essence of what education should be. Thank you for sharing your journey with us.

Sunita Rao
ParentEvery parent should read this. It shows the true impact of dedicated educators.
LATEST UPDATES
1 जून 2025 रोजी Santosh Gajanan Pathare यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी Rotary Club of Thane S तर्फे Vocational Excellence Award ने सन्मानित करण्यात आले. संतोषची चित्रपटाची आवड त्याच्या आईकडून आलेली असून कॉलेजमध्ये असतानाही त्याची ही आवड दिसून येत होती. एमएससी केमिस्ट्रीनंतर लेक्चरर म्हणून काम करत असताना त्याने पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केला आणि त्यातून त्याचा चित्रपट समीक्षक, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला. तो प्रभात चित्रमंडळ, आशियाई चित्रपट महोत्सव यासारख्या संस्थांमध्ये सक्रिय असून, Postman in the Mountain, The First Grader यांसारखे दर्जेदार चित्रपट मित्रांना दाखवत आला आहे. त्याने आतापर्यंत चार चित्रपट दिग्दर्शित केले असून, त्यात सुमित्रा भावे यांच्यावर आधारित चित्रपटाचाही समावेश आहे. त्याच्या कुटुंबाचाही या प्रवासात सहभाग असून, पत्नी आरती आणि मुलगी संहिता यांनी सुद्धा चित्रपट निर्मितीत साथ दिली आहे. संतोषचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व, साधेपणातून मांडलेलं ज्ञान आणि समाजासाठी केलेलं योगदान हे खरं कौतुकास्पद आहे. त्याचं हे कार्य भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात फुलोफांवलं जावं, हीच सदिच्छा!

भरपूर शोध आणि अनुभव असलेला एक सुंदर प्रवास -
- "मुंबई ते मेघालय"
Mumbai to Meghalaya" – A book by Shri Devendra Anant Tamhane "Mumbai to Meghalaya" is not just a travelogue—it's a heartfelt narrative of purpose, discovery, and service. Penned by Shri Devendra Anant Tamhane, the book captures his month-long stay in the remote villages of Meghalaya, where he dedicated himself to teaching and mentoring underprivileged students. With a lifetime of experience in education and counseling, Shri Tamhane immerses himself in the lives of students and teachers in rural Meghalaya. Through simple science experiments, inspiring discussions, and value-based education, he bridges the gap between urban opportunity and rural aspiration. This journey, from the bustling streets of Mumbai to the serene hills of Meghalaya, becomes a metaphor for inner transformation. It's a story of how one educator, driven by compassion and commitment, brings light to classrooms that needed not just knowledge, but hope. The book beautifully weaves together moments of struggle, connection, and quiet triumph—offering readers a glimpse into the power of education to transform lives, and the joy of giving beyond boundaries.


AN INSPIRING LEADER
His guidance has also enriched CSR initiatives for companies like GMR Warora Chandrapur and GEEP Industries, Thane. Most recently, in April 2024, he spent a month in Meghalaya, living in rural communities, mentoring students and teachers, and laying the groundwork for a yoga-integrated school, to be launched in February 2025.
HIS INVOLVEMENT
Contact Us
Reach out to Shri Devendra Anant Tamhane via WhatsApp for educational guidance, mentorship, or to learn more about his initiatives.